Monday, February 10, 2014

विंदा करंदीकर (शलाका)

कवी विंदा करंदीकर
कवितेचे नाव : शलाका

सत्य युगांतर -
                       सत्ययुगाच्या अखेर झाली
                       'प्रेम' द्वेष यांच्यात लढाई
                       द्वेष जाहला विजयी आणिक
                       वर्ष प्रेम आइच्या हृदयी

     खरे तर कलयुगात प्रेम हि संकल्पना फक्त स्वार्थी राहिली आहे. कारण जनमानसात फक्त स्वार्थ साधण्यासाठी प्रेमळ वागणारी लोक असतात परंतु देवानंतरची व्यक्ती आई आहे.आईचे प्रेम हे जगातील सर्वात अनमोल असते. म्हणूनच कवीला हि चारोळी सुचली असावी. जगाच्या इतिहासात हिंदू धर्म परंपरेनुसार चार युग आहेत. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलयुग, -- सतयुगाच्या अखेरीत मनुष्य मात्र या पृथ्वीवर राहिले आहेत. आणि त्यात प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई  झाली. खरे तर माणसामाणसात भेद निर्माण झाला. आपापसातले प्रेम नाहीसे झाले  आहे. आणि द्वेषाला या जगात स्थान  मिळाले आहे. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत.त्याची साक्ष महायुद्धे देतात. एवढा द्वेष माणसाच्या आतल्या द्वेषामुळे निर्माण झाला. आणि प्रेम फक्त आई च्या हृदयात लपले. आई म्हणजे जगत जननी होय. कवीच्या चार ओळीत आई आणि प्रेम यांचा अर्थ कळतो. आई आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या जवळ असल्यावर त्यांची किंमत कळत नाही तर त्या लांब गेल्यावर कळते आणि डोळे अश्रुनी डबडबतात.

सारांश :           रामायण वाचुनिया नंतर
                       बोध कोणता घ्यावा आपण?
                       श्रीरामास मिलता नायक
                       वानरसुद्धा मारिती रावण

    रामायण वाचल्यानंतर पुरुशार्याची खरी व्याख्या काय हे कवीला दाखवायचे आहे. आज जगात अनेक नायक झालेत पण सगळेच महान होऊ शकले नाहीत. नेता जसा तसे लोक. नेत्याची, राजाची ओळख करून दिली " नेता कसा असावा " याचे उत्तम उदाहरण म्हणजेच प्रभू श्रीराम. होय, असा नेता जेव्हा मिळतो तेव्हा सामान्य माणूस देखील मोठमोठ्या शत्रूला हरवू शकतात. याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपति शिवराय. शिवरायांसारखा नेता मिळाल्यामुळे या हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण झाले. दऱ्या खोऱ्यातील मावळ्यांचा मनात प्रचंड देशप्रेम जागवून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना  केली. नेतृत्व क्षमता ज्या व्यक्तीत असते तो समाजात नेता म्हणून मार्गदर्शन करतो व असामान्य  लोकांकडून करून घेतो. त्यामुळे नायक श्रीरामासारखा असणे अपेक्षित आहे.


इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पहस्थल त्याचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा

इतिहासातून मानवाने बोध घेणे महत्वाचे असते. त्यातून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन मिळत असते. परंतु मानव प्राणी इतिहासाला कवटाळून बसतो आपल्या पूर्व इतिहासाला कोसत बसतो. त्यातल्या चुका रटाळपद्धतीने घडोघडी चघळत असतो. त्यामुळे त्याचा भ्रमनिरास होऊन दुख्खाचा भोगी होतो आणि आपल्या भविष्याला अंधारात ठेवतो. त्यामुळे त्याच्या जीवनाची दिशाभूल होते.
                  खरेतर इतिहास म्हणजे जीवनात आपल्याकडून त्याच चुका पुन्हा होऊ नयेत आणि वर्तमानात त्यावर विचार करून व्यवस्थित व धीरोदात्तपणे योग्य पूल उचलल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते. त्यामुळे कवीने या चार ओळीच्या कवितेत खर्या अर्थाने जगण्याची वाट कशी निर्माण करावी हे शिकवले. त्यामुळेच या चार ओळीत जगण्याची ताकद मिळून देणारे शब्द दडलेत., या ओव्यांमद्धे कवीने इतिहासाचा अर्थ व्यापून टाकला आहे.

2 comments:

  1. शलाका ह्या कवितेत अजून दोन कडवी होती.. ती पोस्ट करा प्लिज..त्यातील एका कडव्याचा साधारण सारांश असा की . बालकाच्या गालावरील खळीत देवाने अमृत ठेवले आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. स्वर्गातून येताना बालक
      अमृत त्याचे काढून घेती
      उरे रिकामी वाटी जवळी
      तीच खळी ही गालावरती

      Delete