Friday, February 7, 2014

वसंत बापट (केवळ माझा सह्यकडा)

कवी वसंत बापट
वसंत बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रात कऱ्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर 'नॅशनल कॉलेज आणि रामनारायण रूईया कॉलेज' हया महाविद्यायलयांतून मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. इ.स. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरूदेव रवींद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते.


वसंत बापट भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते सहभागी होते. ऑगस्ट, इ.स. १९४३ ते जानेवारी, इ.स. १९४५ पर्यंत ते तुरूगांत होते. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ ते पर्यंत ते मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक होते. इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते.

इ.स. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लहानपणापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा' , 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते.

कवितेचे नाव : केवळ माझा सह्यकडा


 भव्य हिमालय तुमचाआमचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा
मानत पूजीन रायगड़ा

           या कवितेतून कविचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम दिसून येते. खरया अर्थाने महाराष्ट्रात जेजे सुंदर आणि भव्य आहे ते ते सर्व भारतीयांचे आहे. परन्तु भारताचे उदात्त व सुंदर व भव्य आहे. त्याला कवी सर्वांचे असल्याचे मानतो. परंतु कवी आपल्या मायबोलीचा , मराठी संस्कृतीचा अभिमान विसरु शकत नाही. त्यामुळे कवी या कवितेत महाराष्ट्रातील भव्य दिव्य गोष्टींवर आपला हक्क मानतो व कवितेत देखील मांडतो. कवीच्या या कवितेतील ओळी मराठी माणसाच्या मनाला भिडतात. म्हणून देशप्रेम तर आहेच परंतु महाराष्ट्राबद्दलचे प्रेम तो आवर्जून मांडतो. 

तुमच्या अमुच्या  गंगा-यमुना
केवळ माझी भिवर थडी
प्यार मला हे कभिन्न कातळ
प्यारी मला हि छाती निधडी

भारतात गंगा यमुना या नद्यांचे स्थान माते प्रमाणे आहे. कवीला खऱ्या अर्थाने भारताबद्दल प्रेम आकर्षण आहेत तेथे तो नाकारत नाहीऽत कवीला महाराष्ट्रातील भीमेचा काठ अधिक जवळचा वाटतो म्हणूनच कि काय कवी भिवर थडी चा आधारच त्याला मोठा वाटतो. कविला या अभिन कतलिवर प्रेम असल्याचे तो या कवितेत मांडतो. खर्या अर्थाने मराठी मनसे निधड्या छातीची आहेत असं त्याला म्हणायचे आहे.

मधु गुंजन लाखलाभ तुम्हाला,
बोल रंगला प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते
तुक्याचा आधार मला

या चार ओळीच कवीने जणू संपूर्ण जगाचे तत्वज्ञानच मांडून ठेवलेलं दिसून येत. परंतु बुद्ध, ख्रिस्त यांचे विश्वशांतीचे प्रतिक त्याला भावते. त्यापेक्षा त्याला संत तुकारामांचे अभंग मनाच्या जवळचे वाटतात. त्याला ते धर्माचे आधार वाटतात. खर्या अर्थाने तुकाराम महाराजांनी अभंगातून समाजसुधारणेचा तहात मांडला होता. कवीला संत तुअकरमनचे समाज प्रबोधन भावते. खऱ्या अर्थाने केवळ माझा सह्यकडा हे शाहिरी गीत महाराष्ट्राविषयी अभिमान जागवण्याचे काम करतात.

धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुम्बीन मी माती
या मातीचे कण लोहाचे
तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजूनी
वाहतसे लावा सगळा

लोक स्वर्गाचे गुणगान करत असतात।पन कवीला आपल्या मातीचे चुंबन करण्यास आवडते. कवीला महाराष्ट्राची माती त्याच्या प्राणाहूनही प्रिय वाटतेक़वि म्हणतो या मातीच्या कणाकणात शौर्य सामावलेले आहे. आणि या मातीतील लोकांच्या हृदयात देशप्रेमाचा लाव्हा वाहतो. खरेतर महाराष्ट्राच्या मातीत वीर स्वर्च्य धारा वाहतात. त्यामुळेच तर जाज्वल्य देशप्रेमाचे अभिदर्शन या कवितेतून कवी मांडतो. आणि यातूनच युवकांना देशप्रेमाचे दर्शन होत असते.

No comments:

Post a Comment